Life of Stories cover art

Life of Stories

Life of Stories

By: Anuradha Shaila Aarti Madhavi Jayashree Asavari Ranjana & More
Listen for free

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

© 2026 Life of Stories
Art Literature & Fiction
Episodes
  • # 2061 :उंदीर मारायला तलवार कशाला ? (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Jun 19 2026

    Send us Fan Mail

    जगातील अजेय समजला जाणारा एक तलवारबाज योद्धा... पण त्याची झोप उडवली एका छोट्याशा उंदराने!

    तलवार चालली, घरातील सामान तुटलं, पण उंदीर काही हाती लागेना. ही बातमी ऐकून मांजरीसुद्धा घाबरल्या.

    शेवटी मार्जार राणी स्वतः मैदानात उतरली आणि एका क्षणात सगळा खेळ संपवला. तेव्हा ती हसून म्हणाली,

    "उंदीर मारणं हे योद्ध्यांचं काम नसतं आणि तलवार हे उंदीर मारण्याचं हत्यार नाही!" ऐका, एका उंदराने अजेय योद्धा आणि संपूर्ण मांजरसमाजाला कसं हैराण करून सोडलं, ही भन्नाट झेनकथा.

    Show More Show Less
    5 mins
  • # 2060 : रामायणातील मंथरा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Jun 14 2026

    Send us Fan Mail

    कैकयच्या अश्वपती सम्राटाची मुलगी कैकेयी राजा दशरथांची तिसरी बायको होती. ती खूपच देखणी आणि साहसी देखील होती. कदाचित या कारणामुळेच राजा दशरथांचे तिच्यावर जास्त प्रेम होते. लग्नानंतर पाठराखीण म्हणून कैकेयीची ही दासी तिच्यासोबतच अयोध्येस आली होती.
    राणी कैकेयी आणि दासी मंथरा ह्या दोघी कैकय देशातील होत्या. मंथरा, राणी कैकेयीची लहानपणापासुन परिचयाची व अतिशय विश्वासू दासी होती. कैकेय देशाच्या राजा अश्वपती यांचा एक भाऊ होता, ज्याचे नाव बृहदश्व होते. त्याला एक मोठ्या डोळ्यांची मुलगी रेखा नावाची मुलगी होती. ती लहानपणापासूनच कैकेयीची मैत्रीण होती. ती राजकन्या तर होतीच त्याच बरोबर बुद्धिवान सुद्धा होती. लहान वयातच तिला एक आजार झाला. या आजारात तिचं सर्वांग घामाने चिंब व्हायचे, त्यामुळे तिला खूप तहान लागायची.

    Show More Show Less
    9 mins
  • # 2059 : पाताळलोक. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Jun 12 2026

    Send us Fan Mail

    वामन अवतार कथेत बळीराजाकडे श्रीविष्णू भिक्षेमध्ये तीन पावले भूमी मागतात. बळी त्यांना तीन पावले जमीन देण्याचे वचन देतो. मग वामन रूपातील विष्णू एका पावलात स्वर्ग व दुसऱ्या पावलात पृथ्वी व्यापल्यावर आता “तिसरे पाऊल कोठे ठेवू?” असे विचारतात. सत्यवचनी राजा बळीवर धर्मसंकट ओढवते. देण्यास काहीच जागा शिल्लक राहिली नाही, परंतु तरीही जर दिलेल्या वाचनाला जागलो नाही तर तो अधर्म ठरेल असा विचार करून शेवटी राजा बळी वामनासमोर आपले डोके धरतो व आपल्या डोक्यावर तिसरे पाऊल ठेवावे, अशी विनंती करतो. वामन अगदी तेच करतो आणि राजा बळीला पाताळात ढकलतो.

    Show More Show Less
    10 mins
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet